संस्कृती - Culture लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संस्कृती - Culture लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दीप अमावस्या - आषाढ अमावस्या

                                                                      ।। श्री ।। 


                                  आषाढ अमावस्या - दीप अमावस्या 

                                     सोमवार १७ जुलै २०२३ रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच  दीप अमावस्या आहे. आषाढ अमावस्येनंतर येणाऱ्या पूजांच्या तयारीसाठी घरातील सर्व दीप स्वच्छ करून भक्तिभावाने पुजले जातात . अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीप मांगल्याचे प्रतीक आहे .दीपपूजन करून गोडाधोडाचे नैवेद्य दाखवतात , दीप आरती म्हणतात .सर्वदिप प्रज्वलित करून पूजा करतांना इतकं प्रसन्न आणि आनंदमय वातावरण होत.आणि एक उत्साहाची लहर शरीरात उत्पन्न होते .

या दिवशी मांसाहार करून पुढे अनंत चतुर्दशी पर्यंत मांसाहार करीत नाहीत .पण सध्या या बेधुंद आणि बेबंध राहणाऱ्या काही समाज कंटकांनी गटारात लोळण्याची वेळ येईपर्यन्त दारूच्या बाटल्या ढोसून so called " गटारी अमावस्या " म्हणून या दिवसाची निर्बत्सना केली . आणि दुर्दैव असे कि सोसिअल मीडियावर मुद्दाम मुद्दाम गटारी अमावस्या म्हणून उल्लेख केला जातो काही वाहिन्यांनी तर कहरच केला - चित्रपटाची जाहिरात करतांना " गटारी स्पेशल " म्हणून उल्लेख करतात . खरंतर दारू ढोसणाऱ्याला दिवस आणि मुहूर्ताची काही गरज नसते - आली लहर केला कहर अशी त्यांची अवस्था असते . पण जाणूनबुजून संस्कृती बद्दल गैरसमज वाढवणाऱ्या या वळवळत्या किड्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ज्याचे जे वैशिष्ठ्य आहे ते अबाधित राहत हे पक्के ध्यानात ठेवाव

अनेक साईटवर दीप अमावास्येची माहिती दिलेली असते , आणि काही साईटवर शेवट अशी टीप लिहिलेली असते कि " येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. " बरोबरच आहे कारण शास्त्राला " अनुभूती " म्हणजे काय हे कळतच  नाही , शास्त्र तिथपर्यंत पोचूच शकत नाही मग  शास्त्र कसले पुरावे देणार !

                                                                                                                      ...... मालकंस 

  अधिक मास 

                                                                   पुरुषोत्तम मास 


                                             आपली हिंदू कालगणना , पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती , पृथ्वीची स्वतः भोवती फिरण्याची गती आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची गती या तीन  परिमाणांवर केली जाते म्हणजेच सौरवर्ष आणि चांद्र वर्ष . या तीन  गतींमध्ये दरवर्षी अकरा दिवसांचा फरक पडतो .आणि हा फरक भरून काढण्यासाठी बत्तीस  महिन्यांनी  अधिक मास घेतला जातो ज्या महिन्यात रवीची संक्रांत होत नाही .आणि हा काळ आषाढ आणि श्रावण या दोन महिन्यांमध्ये असल्यामुळे अधिक श्रावण येतो .

                                       अधिक महिन्यात , मुलगी आईची ओटी भरते तसेच जावयाला , ब्राह्मणाला , गाईला अधिक महिन्यात वाण देतात अधिक मास - या वर्षी - १८ जुलै २०२३ प्रतिपदा  ते १६ ऑगस्ट २०२३ अमावस्या .

                                      बाकी आपण श्रावण सोमवार  , इतर उपवास , व्रत वैकल्य पारायण वाचन हे श्रावण महिन्यातच करावे . श्रावण मास -  या वर्षी - १७ ऑगस्ट २०२३ प्रतिपदा  ते १५ सप्टेंबर २०२३ अमावस्या

         या वर्षी श्रावण सोमवार - २१ ऑगस्ट २०२३ /  २८ ऑगस्ट २०२३ /  ४ सप्टेंबर  २०२३ / ११ सप्टेंबर  २०२३

अधिक महिन्यात दशमी , एकादशी , द्वादशी पौर्णिमा या दिवशी दान देतात .अधिक महिन्यात गंगास्नान हि करावे . अनारसे ,बत्तासे पेढे यांची दान दिली जातात . 

                                अधिक  मासात विष्णू स्वरूप कृष्णाचे महत्व असल्यामुळे कृष्णाला अधिक मासात दररोज तुळशी वाहून लोण्याचा नैवेद्य दाखवतात 

                                                                                                  ..................................मालकंस 

                                                                                                                          विनता उद्योग समूह 

वैवाहिक जीवन - विनता सोसिअल - मराठी - भाग १ - Vaivahik Jivan - Part १

                                        वैवाहिक जीवन 

भाग १
                " आमच्या वेळी असं होत ,,आमच्या वेळी तसं होत ,,  आम्ही खरं आयुष्य जगलो " 
                       छे ,ऐकून ऐकून कंटाळा आला आहे , जुन्या  काळातलं सांगत राहतात 
                 अहो काळ किती बदलला आहे , आता जुन्या गोष्टी काही राहिलेल्या नाहीत .
               खूप बदललेल्या आहेत 
कोण  सांगणार यांना ?
गोष्टी बदलेल्या आहेत ? खरंच असं वाटत ?
साठ सत्तर वर्षांपूर्वी पुरुष जसा होता तसाच आजही आहे 
साठ सत्तर वर्षांपूर्वी स्त्री जशी होती तशीच आजही आहे 
साठ सत्तर वर्षांपूर्वी दोचांमध्ये ज्या भावना होत्या त्या आजही आहेत 
संतती होण्यासाठी दोघांनी एकत्र येणं हे आजही गरजेचं आहे जे पूर्वीही होत
स्त्री पुरुष दोघांनाही एकमेकांचा सहवास , हवाहवासा आजही वाटतो .
या सर्व जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत नैसर्गिक गरजा आहेत त्या आजही तश्याच आहेत 
मग बदललं काय ?
" विचार "
" तंत्रज्ञान "
तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला !
विचार बदलले तसे आचारही बदलले .
विचार बदलले  तश्या अपेक्षा . राहणीमान , भावनांचा अग्रक्रम बदलला 
तंत्रज्ञानाचा पगडा विचारांवर इतका पडला कि 
काय करावं , काय करू नये , याचा सारासार विचार करण्याची क्षमता कमी झाली 
 प्रेम वात्सल्य ,त्याग ,आदर, विनम्रता , विश्वास  ,संयम आणि स्वार्थ .या भावना आजही मनात आहेत 
पण .......
भ्रामक सुखाच्या अति मागे लागल्यामुळे स्वार्थ या भावनेने बाकी भावनांना बांधून ठेवलं
चार भिंतीत एकत्र राहत असले तरी एकमेकांपासून फार दूर 
मी आणि माझं विश्व् या भोवतीच फिरत राहिलो .
सामाजिक विचारांच्या बदला मुळे
स्त्री घराबाहेर पडली , पूर्वी   कधी जे तिने विश्व् बघितलं नाही त्या विश्वात ती लीलया रमायला लागली.
स्त्रीच्या आचारतेत झालेला हा बदल खरंच व्यक्ती म्हणून निर्विवाद कौतुकास्पद आहे .
पण हे कौतुक काही अंशी पुरुषाला मानवल नाही . 
आणि 
जीवन होडीच्या मध्यावर हातात हात घालून उभी असलेली ती दोघं 
होडीच्या दोन टोकावर जाऊन राहिली .


  

जोडीदार निवडतांना । Jodidar nivadatanna । भाग २

  जोडीदार निवडतांना । Jodidar nivadatanna ।

नातं ....

---- नातं म्हटलं कि त्याचा थेट संबंध मानसिकतेशी जातो , आणि मानसिकता म्हणजे भावनांचा खेळ ! भावनांचा खेळ आपल्या नात्याचे भविष्य ठरवत असतो आणि त्या भावना म्हणजे प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम

आजच हे धाकदगदीचे जीवन , बदललेला काळ असे म्हणून आपण जीवनातील या अत्यंत महत्वाच्या मानसिक पैलूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो . हेच पैलू आपले जीवन सुखी करीत असतात..

बदललेले दृष्टिकोन ..... . गृहिणी - कुटुंबाचा आधारस्तंभ , कि जिच्यामुळे कुटुंबव्यवस्था अबाधित होती ,प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम या सर्व भावना तिच्या ठायी असायच्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याची शिकवण कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला देत असे आणि ती म्हणजे " आई " आता काळ बदलला म्हणजे समाजाने बदलला ,जीवनातील मूल्ये बदलली , जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला , तंत्रज्ञाना मुळे कुटुंबातील भावनांचा एक घट्ट बंध होता तो सैल झाला एकमेकांपासून दुरावले , एकाच छताखाली राहत असले तरी काहीसे एकमेकांना अनोळखी , मूल्य - उत्कृष्ठ भावी पिढी घडवणाऱ्या या आईचे मूल्य हा समाज म्हणजे पर्यायाने पुरुष समजू शकले नाहीत .प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम ह्या गोष्टी जिच्याठायी होत्या तिला प्रत्येक बाबतीत गृहीतच धरलं गेलं तिच्यावर वर्चस्व गाजवलं गेलं .कालांतराने ती करिअर साठी घराबाहेर पडली . आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली . आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस येण्याच्या मार्गावर राहिली . गरज कशाची - प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम .ह्या सातही हि गोष्टी ज्या दोघां जोडादारांमध्ये आहेत त्यांचे नाते कधीही तुटू शकत नाही , कितीही संकटं आली तरी या सात गोष्टी संकटावर सहज मात करतात . किंबहुना त्यांच्याइतकी सुखी जोडी दुसरी कोणती हि नाही ! तंत्रज्ञानामुळे जीवन जरी वेगवान झालं असाल तरी याच तंत्रज्ञानाने प्रत्येक व्यक्तीला आत्मकेंद्रित बनवलं . त्यामुळे वात्सल्य ,त्याग , विनम्रता , विश्वासआणि सर्वात महत्वाचा म्हणजे संयम ह्या गोष्टी हळू हळू मनातून हद्दपार होऊ लागल्या आणि त्यांची जागा अहंकाराने घेतली. प्रेम आणि आदर ह्या गोष्टी गरजेपुरत्याच राहिल्या . पैसा गाडी बंगला सर्व काही आहे पण सुख काय म्हणतात ते कधी अनुभवलच नाही अशी परिस्थिती बहुतांशी होते . काय करावं - नातं हे मनातील भावनाच्याच खेळावरती अवलंबून असत ,हे जोपर्यंत समाजाला , समाजाला कशाला आपल्यापासूनच सुरवात करूया - जोडीदार निवडतांना आपल्यामध्ये ह्या सातही गोष्टी आत्मसात करावयास शिकाव्या , जोडीदार होणाऱ्या कुटुंबाशी नुसतेच औपचारिक बोलण्या ऐवजी त्यांचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करावा ..पैसा जीवनात आरामदायी सुखवस्तू निश्चितच देईल पण सुख मिळेलच असे नाही .आपण ज्या जोडीदाराबरोबर आयुष्य सुरु केलं आहे ,तेव्हा सुरवातीच्या काळात त्याला समजून घेतलं तर पुढील आयुष्यात ते उपयोगी ठरेल . विशेष करून स्त्रियांचा हरवलेला पैलू " आई " होण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच जोडीदारामध्ये हवा तसा बदल घडू शकेल आणि दोघांमधील नातं निश्चितच घट्ट होईल लक्षात ठेवा - .आजच्या बदलत्या काळात व्यक्ती स्वातंत्र इतकं फाजील बोकाळलं आहे कि सतत एकमेकांवर कुरघोडी करण्या पलीकडे कोणताही संवाद होत नाही .जगण्यासाठी पैसा निश्चितच आवश्यक आहे पण जगण्याचे ध्येय पैसा असू नये . जीवन हे बंधन युक्त असेल तरच सुखी होऊ शकत.

भिन्न संस्कार ,  भिन्न परिस्थियतीतीत  वाढलेली माणसे एकत्र राहू लागतात तेव्हा नेमकं काय करणं आवश्यक आहे , घटस्फोटापर्यंत का वेळ यावी या सर्वाचा उहापोह पुढील लेखात ....

घटस्फोट ? का ? आणि कशासाठी । Divorce ? Why ?



Next

असा प्रसंग - अशी वेदना

                                                                         । ।   श्री  । ।                                              असा प्...